प्रवीणकुमार यांचा प्रवास : चळवळीचा क्रियाशील सदस्य ते सार्थक जीवन या परिवर्तनाची कहाणी
१९७४ च्या दरम्यान स्वतःसाठी अधिक चांगला भारत उपलब्ध व्हावा या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी चळवळ केली होती. त्यातील एक तरुण प्रवीण कुमार होता. स्वातंत्र्योत्तर दशकात रांची मधील एका मोठ्या कुटुंबात वाढताना त्याच्यावर राष्ट्रहित सर्वोच्च ठेवण्याचे संस्कार झाले होते. त्याने विद्यार्थी चळवळीत मोठ्या हिरीरीने भाग घेतला. जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने मुख्य आयोजक समितीपर्यंत मजल मारली. पण एक दोन वर्षातच त्याचा अपेक्षाभंग झाला, त्याच्या लक्षात आले की त्याला जीवनात जे साध्य करायचं होतं त्याकरता राजकारण हा योग्य मार्ग नव्हे. आणि म्हणून राजकारण सोडून तो उच्च शिक्षणाकरता निघून गेला.
जरी त्याने राजकारण सोडलं होतं तरी समाजाला कसं एकत्रित आणि प्रेरित करावं, विश्वास कसा संपादन करावा आणि एखाद्या चळवळीचे नेतृत्व कसं करावे, याचे धडे त्याला मिळाले होते. त्याच्या भावी आयुष्याला आकार देणारी बीज पेरली गेली होती.
फोनचा दैवी योगायोग
१९९७ मधल्या एका दिवशी त्याला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एका प्रशिक्षकाकडून फोन आला आणि त्याला एक कार्यशाळा आयोजित करण्याची विनंती केली. आज दोन दशकानंतर सुद्धा प्रवीणला याचा उलगडा होत नाही की कार्यशाळेतल्या कोणत्या गोष्टीमुळे तो त्यासाठी काम करण्यास प्रेरित झाला. पण त्याबद्दल तो फारसा विचार करत नाही. तर्काच्या पलिकडल्या गोष्टी त्याच्या जीवनाचा भाग झालेल्या आहेत.
तो विनोदाने म्हणतो “बरं झालं प्रशिक्षकाने मला आयोजन करायला सांगितल, त्यात सहभागी होण्यास नाही सांगितलं. नाहीतर ते कधीच झालं नसत.” पण प्रवीणने आयोजनाबरोबर त्यात सहभाग सुद्धा घेतला. आणि त्याच्या नेहमीच्या हास्याबरोबर रम्य स्मृतीत हरवून जात “त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही.”
बदलासाठी व्यासपीठ
आर्ट ऑफ लिव्हिंग मुळे त्याला हवा असलेले व्यासपीठ मिळाले. सर्वांगीण सामाजिक विकासात रुजलेले व्यासपीठ, संस्थेच्या आचारसंहितेची आधारशिला.
या उपक्रमांची परिवर्तनीय क्षमता ओळखून, प्रवीणने उत्साहाने आपला नवीन छंद स्वीकारला, कार्यशाळा आयोजित केल्या ज्याने सहभागींना सुदर्शन क्रिया आणि गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रगल्भ ज्ञानाची ओळख करून दिली. प्रवीणसाठी, या कार्यशाळा निव्वळ कार्यक्रमांपेक्षा अधिक होत्या; ते वैयक्तिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तनासाठी उत्प्रेरक होते.
१९९९ मध्ये प्रवीण आर्ट ऑफ लिविंग चा प्रशिक्षक झाला. त्याच काळात “युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर”या कार्यक्रमाची नुकतीच सुरुवात होत होती जी पुढे जाऊन राष्ट्रीय ग्रामीण चळवळ बनणार होती. प्रवीणने त्यात स्वतःला झोकून दिले. तो अभिमानाने सांगतो “२००१ मध्ये जवळजवळ शंभर युवा स्वयंसेवक रांची जिल्ह्यात पूर्ण वेळ कार्यरत होते ज्यांना मी मार्गदर्शन केले होते.” ही साधीसुधी गोष्ट नव्हती.
विश्वासाची चाचणी
मात्र, प्रवीणचा प्रवास आव्हानांशिवाय नव्हता. रांची – ओळख संघर्ष आणि प्रचंड दहशतवादाने झगडत असलेल्या प्रदेशात काम करताना – भयानक अडथळे सादर केले. नाऊमेद न होता प्रवीण आपल्या कार्यात जोखीम न बाळगता आपल्या ध्येयात स्थिर राहिला.
अशा परिस्थितीत, २००३ मध्ये एका साधारण अशा दिवशी प्रवीण झारखंड मधल्या एका जिल्ह्यातील एका दुरस्थ खेड्याकडे त्याच्या कामासाठी निघाला होता. तो जेथे चालला होता तो भाग अत्यंत बदनाम होता, कोणीही संध्याकाळ नंतर तिथे जाण्याचे धाडस करीत नसे. पण प्रवीण अशा गोष्टींना घाबरणारा नव्हता, शेवटी अशाच ठिकाणी काम करण्याची जास्त आवश्यकता असते. अचानक चार वाजता एका निर्मनुष्य रस्त्यावर त्याची कार बंद पडली आणि काही क्षणातच सशस्त्र बदमाशांनी त्याला गराडा घातला.
दैवी हस्तक्षेपाच्या क्षणी, तुरुंगात झालेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यशाळेत माजी सहभागी असलेल्या एका बदमाशाला त्याची ओळख पटली. या व्यक्तीने प्रवीणला प्रशिक्षक म्हणून लगेच ओळखले आणि त्याच्याकडे धाव घेतली. ते त्याच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी.
इतर गोंधळले पण त्यांनी सुद्धा अनुकरण केले. त्यांनी प्रवीण त्या दिवशी सुरक्षित घरी जाईल याची काळजी घेतली. एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याचा त्याचा निर्धार पाहून या कामात त्याला साथ देण्याचा निश्चय केला.
त्या दिवशी प्रवीणला गुरुकृपेच्या विशालतेचा अनुभव आला.
तळागाळात बदल
काही वर्षात एका मागोमाग एक टप्पा पार करत , एका मागोमाग एक प्रकल्प हाती घेत प्रवीणने झारखंड मधील खेड्यांच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम केले.
२०१७ मध्ये, झारखंड सरकारने आर्ट ऑफ लिव्हिंगला ६० पंचायती तयार करण्याची जबाबदारी सोपवल्यामुळे, प्रवीण यांना एका वर्षाच्या कालावधीत हे कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी सोपवण्यात आले. पण एका वर्षापेक्षा कमी कालावधीत त्याने झारखंडमधील सात जिल्ह्यांमध्ये समर्पित स्थानिक युवा नेत्यांची यशस्वी टीम तयार केली आणि त्यांना परिवर्तनाचे प्रतिक बनण्यासाठी मार्गदर्शन केले. या प्रतिभावान संघ बिल्डर आणि मार्गदर्शकाचा हा आणखी एक मास्टरस्ट्रोक होता.
प्रवीणला उत्कटतेने वाटते की झारखंडमध्ये एक मजबूत पंचायती राज व्यवस्था आहे, परंतु जेंव्हा आपणास कार कशी चालवायची हे माहित नसते तेव्हा कार असण्याला काही अर्थ नाही. अशा प्रकारे, आजकाल तो झारखंडच्या पंचायत सदस्यांना सक्षम बनवण्याच्या प्रकल्पात प्राण फुंकत आहे.
सूक्ष्म नियोजन आणि समर्पित मार्गदर्शनाद्वारे, प्रवीनने स्थानिक तरुणांना त्यांच्या नशिबाची मालकी घेण्यास सक्षम केले, ज्यामुळे तळागाळातील मूर्त बदल घडवून आणले.
शिकलेले धडे
संघ तयार करण्यासाठी आणि कठीण काळात टिकून राहण्यासाठी काय आवश्यक आहे याबद्दल विचारले असता, प्रवीण म्हणतो, “तीन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रथम योग्य नियोजन आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत. दुसरे म्हणजे काम आणि आर्थिक बाबतीत शिस्त आणि तिसरी भक्ती जी कामात समर्पण आणते.
त्यांनी नमूद केले की समाजाच्या विकासात काम करण्यासाठी विश्वास आणि मूल्यावर मूल्याधारित नातेसंबंध निर्माण करणे या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आज, तळागाळातील बदल घडवणारे बी.बी. चावला यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली संघ झारखंडमध्ये २२ मोफत शाळा चालवत आहे.
पिढ्यानसाठी प्रेरणादायी आशा
मागे वळून पाहताना, प्रवीण म्हणतो की त्याच्या गुरूंची कृपा आणि कालांतराने प्रकल्पाच्या लाभार्थ्यांशी निर्माण झालेले नाते ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे.
प्रवीण कुमारची कथा चिकाटी आणि सेवेच्या परिवर्तनीय शक्तीचे प्रतीक आहे. रांचीच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते सामाजिक बदलाच्या मार्गापर्यंत, त्यांचा प्रवास पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणा आहे – योग्य व्यासपीठाच्या सहाय्यानेते देखील त्यांच्या समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात.